अग्रणी नदी बारमाही होणार
महाराष्ट्रातल्या पहिल्या जल-जन जोडो मोहिमेची फलश्रुती
http://magazine.evivek.com/?p=6141
साप्ताहिक विवेक
२० जुलै २०१४
****विजय लाळे*******
जलबिरादरीच्या माध्यमातून देशभरात चोवीस हजाराहून अधिक जोहाड उभारले आहेत. या सर्व ठिकाणी नदी किंवा ओढे वाहते करण्याचे काम यशस्वीरित्या झालेले आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर उस्मानाबाद जिल्ह्यात रांजणी येथील भैरवनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठोंबरे यांच्या खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन ते समृध्द पाणलोट व्यवस्थापन म्हणून ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतून जाणाऱ्या अग्रणी नदीला पुनरुज्जीवित करून बारमाही करण्याच्या संकल्पनेला सध्या मूर्त रूप येताना दिसत आहे. महाराष्ट्र जलबिरादरी संस्था, शासन यंत्रणा आणि लोक सहभाग अशा तीन पातळयांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यातल्या प्रत्येक घटकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावल्यास जल-जन जोडोचे ही मोहीम राज्याला प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्रातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ (जि. सांगली) आणि कर्नाटकातील अथणी (जि. बेळगाव) या तालुक्यांतून ही अग्रणी नदी वाहते. मात्र गेल्या 25-30 वर्षांपासून जागोजागी अतिक्रमणे, दुभंगलेले पात्र आणि साचलेला अमाप गाळ अशा तिहेरी संकटात अडकल्याने ही नदी आपले वाहणेच हरवून बसली आहे.
ही नदी बारमाही वाहती करावी, ही संकल्पना भाई संपतराव पवार यांनी जलबिरादरी संस्थेकडे सर्वप्रथम मांडली. त्यास जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, विनोद बोधनकर, डॉ. रवींद्र व्होरा, बापू मदने, नरेंद्र चुघ आणि महेंद्र घागरे यांनी योग्य प्रतिसाद दिला. त्यानंतर राजस्थानातले डॉ. राजेंद्रसिंह यांचे सहकारी गोपालसिंह यांनी सर्वेक्षणानंतर संबंधित नऊ गावातील लोकांचे योग्य सहकार्य लाभल्यास राजस्थानातील जोहाड पॅटर्न खानापुरातही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. अग्रणी ही कृष्णेची उपनदी. खानापूर (जि. सांगली) घाटमाथ्याच्या पठारावर बलवडी गावाच्या बाजूस खानापूर तालुक्यात तामखडीजवळील अडसरवाडीच्या एका टेकडीवर अग्रणीचे उगमस्थान आहे. तिथली उंची 912 मीटर इतकी आहे. ही नदी खानापूर, कवठेमहांकाळ आणि अथणी (जि. बेळगाव, कर्नाटक) या तालुक्यांतून वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. तिथली उंची 549 मीटर इतकी आहे. या नदीचे एकूण अंतर 45 किलोमीटर इतके आहे. या नदीच्या पहिल्या 28 किलोमीटरच्या पात्राला पुनरुज्जीवित करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले. यात खानापूर तालुक्यातील नऊ, तासगाव तालुक्यातील सहा, तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील तेरा गावांचा समावेश होता.
जलबिरादरीने नेमके काय केले?
आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी त्यांच्या राजस्थान राज्यामध्ये पाणी अडवण्याचे, जिरवण्याचे तसेच ओढे, नद्या, नाले जिवंत करण्याचे काम केले आहे. मुळात ज्या भागात पावसाचे प्रमाणच कमी आहे, त्या ठिकाणचे प्रवाह खुले करणे, वाहते करणे हे काम तर जलबरादरी ही संघटना करतेच; तसेच ज्या गावात असा प्रयोग राबवला जातो, तिथल्या रहिवाशांना विश्वासात घेऊन ग्रामसंसद तयार करून त्याद्वारे तिथले सगळे जलव्यवस्थापन करण्याचे कामही जलबिरादरी करते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अवरोध निर्माण करण्यासाठी कंटूरनुसार कालवे काढणे, छोटे सिमेंट बंधारे (चेक डॅम), काटकोन त्रिकोण बांध (ऍलिकट) बांधणे आदी कामेही जोहाड या संकल्पनेत येतात.जलबिरादरीच्या माध्यमातून देशभरात चोवीस हजाराहून अधिक जोहाड उभारले आहेत. या सर्व ठिकाणी नदी किंवा ओढे वाहते करण्याचे काम यशस्वीरित्या झालेले आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर उस्मानाबाद जिल्ह्यात रांजणी येथील भैरवनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठोंबरे यांच्या खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन ते समृध्द पाणलोट व्यवस्थापन म्हणून ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत. तिथे तिथल्या चढ, डोंगर असलेल्या भागात समतल पाझर कालवे काढणे, पावसाचे पडणारे पाणी अडवणे, ते चोहोबाजूंनी बंदिस्त करणे, आवश्यक तेथे छोटे तलाव निर्माण करणे अशी कामे करीत आहेत. डोंगराच्या भागात पाणी अडवले आहे. तसेच खोलगट भाग सहा इंच ते एक फुटापर्यंत मातीने भरून घेऊन आता तिथे भाजीपाला पिकवला जात आहे. काही ठिकाणी खडकात पाणी झिरपत नाही, तिथे पाणी अडवण्यासाठी माती, दगड वापरण्यात येतात. हे झाले काम खासगी कारखान्यांच्या माध्यमातून केलेले. पण महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांपेक्षा ज्या माणदेशातल्या मातीत पाणी अडवून धरण्याची क्षमता जास्त आहे, तिथल्या अग्रणी नदीच्या पाणलोटातही लोकसहभागाची एक सर्वव्यापी मोहीम राबवण्याचा जलबिरादरीने निर्धार केला. जलबिरादरी ही काही निधी देणारी (फंडिंग एजन्सी) संस्था नाही. परंतु लोकांना जलसाक्षर बनवणे, जलजागृती करणे आणि संघटित करून त्यावर उपाय सुचवणे, तसेच विविध क्षेत्रात जलसंवर्धन, जलसंरक्षण क्षेत्रात काम करणारी माणसे जोडणे, हे काम जलबरादरी करते.
खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीकाठच्या सुलतानगादे गावचे ग्रामस्थ सांगतात की, 30-35 वर्षांपूर्वी अग्रणीत दिवाळीनंतर तीन-चार महिने खळाळते पाणी असे, त्यात आम्ही पोहत होतो. आता इथले सरासरी वार्षिक पाऊसमान 550 ते 600 मिलीमीटर लक्षात घेता पोहण्याइतके पाणी जानेवारी अखेरपर्यंत होते, याचा अर्थ त्या काळी नदीत किमान 5 ते 6 फूट पाणी असेल. त्या ठिकाणी पात्र तेवढे खोल असलेच पाहिजे. अलीकडच्या काळात अग्रणीचे पात्र आकसले आहे, तसेच गाळाने गच्च भरले आहे. या नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम जलबिरादरीच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे पुढे न्यायचे, असा निर्णय फेब्रुवारी 2013ला पुण्यात ठरला आणि पुढच्याच महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
अग्रणी पुनरुज्जीवनाचे काम
गेल्या वर्षी मार्चमध्ये अग्रणी पुनरुज्जीवित करण्याच्या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातून सुरुवात झाली. उगमस्थानाजवळच अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. तिथून सर्वेक्षण झाले. या कामासाठी नेमलेल्या पथकाने सुरुवातीच्या टप्प्यात सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन केले. या पथकाने सहा ठिकाणी पाणी अडवण्याच्या दृष्टीने आवश्यक साखळी बंधाऱ्यांची जागा निश्चित केली. इथे अग्रणी नदी दक्षिणेला उगम पावून उत्तरेकडे जाते. तिथून पुढे तामखडी ते बलवडी या रस्त्यानजीकच्या जखिनवाडी हद्दीत ईशान्य दिशेला वळते. तिथे पात्रात मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच मोठया प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे नदी तीन ठिकाणी दुभंगलेली आहे. तसेच पुढे कारीचा म्हसोबा मंदिराजवळही अतिक्रमणामुळे नदी अरुंद झालेली आहे.
अशा ठिकाणचा गाळ, तसेच अतिक्रमणे काढून टाकावी लागणार आहेत. त्यापुढे गोरेवाडी गावाच्या हद्दीत नदी ईशान्येकडून थेट पूर्वेकडे वळली आहे. त्या परिसरात पात्र रुंदावलेले आहे, मात्र तिथेही गाळाने पात्र जमीन पातळीला आले आहे. या गावातून वाहताना नदीला बदकाळ ओढा येऊन मिळतो त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बसू शकतील, असे गोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय सुतार यांनी सुचवले. तिथून पुढे बलवडी, बेणापूर, करंजे अशी वाहत तासगाव आणि पुढे कवठेमहांकाळ तालुक्याकडे जाते. तासगाव तालुक्यात सावळज येथे नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधण्यात आला आहे. राजू सावंत यांच्या ग्रुपने जवळपास 30 मीटरहून अधिक पात्र आडवे आणि खोल खोदून त्यात पॉलिथीन पेपर (अभ्रकाचा कागद) टाकून काळी तसेच करलाची माती आणून टाकली. त्यावर रोलिंग करून हा बंधारा बांधला आहे. त्यामुळे वाहणारे पाणी थांबवून पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही मळणगावपासून रांजणी-लोणारवाडीपर्यंतचे 28 किलोमीटर नदीपात्र रुंद आणि खोल केलेले आहे. तसेच हिंगणगाव बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रातील झाडेझुडूपे काढून पाणी साठवण्यासाठी पात्र उपयुक्त केले आहे. तसेच या नदीतील वाळू उपसा करू नये, केल्यास दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक गावागावात लावले आहेत. या कामी अग्रणी काठच्या हिंगणगावचे उद्योजक देवानंद लोंढे, कवठेमहांकाळचे सरपंच सुनील माळी, चंद्रकात सगरे, तालुका गटविकास अधिकारी अरविंद धरणगुट्टीकर, तसेच परिसरातील गावांतील सरपंच यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य
खानापूर तालुक्यातील बलवडी आणि बेणापूर या दोन गावातील जि.प. सदस्य सुहास शिंदे, भानुदास सूर्यवंशी, राजेंद्र शिंदे, श्रीरंग शिंदे, परशुराम गायकवाड, विलास गायकवाड, सुभाष गायकवाड आदी जाणती मंडळी एकत्र करून भाई पवार यांनीही या भागातील महाविद्यालयांच्या युवाशक्तीचे सहकार्य आपण देऊ, असे आश्वासन दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आराखडे तयार करणे, तसेच श्रमदान करणे या कामी सहकार्य दिले. सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिमेंट बंधाऱ्यांची डिझाईन बनवून दिली. विठ्ठलनगर (बेणापूर) येथे पहिल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले. त्या वेळी डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, तसेच कृषी अधिकारी वगैरे अधिकारिवर्ग उपस्थित होता. त्यामुळे या उपक्रमास शासकीय परिणाम आपोआपच मिळाले. त्यानंतर नदीपात्राचे डिमार्केशन अर्थात हद्दनिश्चिती करण्यात आली. यात रेड झोन म्हणजे पूर रेषा, ब्लू झोन म्हणजे प्रवाहाचे पाणी आणि ग्रीन झोन म्हणजे पात्रालगतचा, असे तीन भाग केले गेले. पहिल्या दोन भागात कोणतेही बांधकाम होणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर जिथे लोकांचा विरोध नाही तिथे बांध बांधायचे, असे नियोजन करण्यात आले. निवृत्त अभियंता विलास चौथाई यांनी काही बंधाऱ्यांचे आराखडे करून दिले. प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यानंतर काही वेळा स्वखुशीने, तर काही वेळा हातउसने पैसे गोळा करून स्थानिक लोकांनी मोठया जिद्दीने कामे पूर्ण केली. या कामी महेंद्र घागरे, ऍड. विनोद गोसावी, गणेश देसाई, नरेंद्र चुघ, राजेंद्र व्होरा यांसारख्या अनेकांनी मदत केली. दिवस-रात्र, ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता राजेंद्र मदने यांच्यासारख्या सरकारी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष फील्डवर उभा राहून लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले. त्यानंतर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने हात दिला आणि अग्रणीवर बांधण्यात आलेले बंधारे अक्षरश: पूर्ण भरून वाहू लागले. इर्षेनेच कसा विकास साधतो, ते खानापूर तालुक्याच्या घाटमाथा परिसरात दिसले. अग्रणी नदीला बारमाही करण्याची संकल्पना पुढे आली आणि बघता बघता त्या संकल्पनेला मूर्त रूपही आले. परतीच्या पावसाने गच्च भरलेले बलवडी आणि परिसरातले बंधारे पाहून बेणापूरकरांनीही या नदीला बांधून ठेवण्याचे महाप्रयत्न सुरू केले.
राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे, सयाजी शिंदे आदीच्या पुढाकाराने तब्बल साडेचार किलोमीटरचे नदीपात्र उभे, आडवे खोल आणि रुंद करण्याची कामे पूर्ण केली. शिवाय त्या ठिकाणी पूर आलाच, तर बंधाऱ्यावर ताण येऊ नये म्हणून एका मोठया भूमिगत बंधाऱ्याचे नियोजन सुरू आहे. शासन जे करू शकलेले नाही किंवा भविष्यातही करणे जमणार नाही, असे काम या भागात लोकसहभागातून उभे राहिले. शिवाय आतापर्यंत शासनाचा एक नवा पैसासुध्दा खर्च झालेला नाही. पदराला खार लावून, स्वत: आर्थिक तोशीस घेत शासनापेक्षा कमी खर्चात, कमी वेळेत आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता केवळ आपली नदी आपणच जिवंत आणि बारमाही करायची, या ध्यासाने हे सगळे काम केवळ विकासाच्या इर्षेने आणि जिद्दीने सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे काम उभे राहत आहे. अशा कामांना पाठबळ देणे हीच खरी काळाची गरज आहे.
8805008957
महाराष्ट्रातल्या पहिल्या जल-जन जोडो मोहिमेची फलश्रुती
http://magazine.evivek.com/?p=6141
साप्ताहिक विवेक
२० जुलै २०१४
****विजय लाळे*******
जलबिरादरीच्या माध्यमातून देशभरात चोवीस हजाराहून अधिक जोहाड उभारले आहेत. या सर्व ठिकाणी नदी किंवा ओढे वाहते करण्याचे काम यशस्वीरित्या झालेले आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर उस्मानाबाद जिल्ह्यात रांजणी येथील भैरवनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठोंबरे यांच्या खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन ते समृध्द पाणलोट व्यवस्थापन म्हणून ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतून जाणाऱ्या अग्रणी नदीला पुनरुज्जीवित करून बारमाही करण्याच्या संकल्पनेला सध्या मूर्त रूप येताना दिसत आहे. महाराष्ट्र जलबिरादरी संस्था, शासन यंत्रणा आणि लोक सहभाग अशा तीन पातळयांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यातल्या प्रत्येक घटकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावल्यास जल-जन जोडोचे ही मोहीम राज्याला प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्रातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ (जि. सांगली) आणि कर्नाटकातील अथणी (जि. बेळगाव) या तालुक्यांतून ही अग्रणी नदी वाहते. मात्र गेल्या 25-30 वर्षांपासून जागोजागी अतिक्रमणे, दुभंगलेले पात्र आणि साचलेला अमाप गाळ अशा तिहेरी संकटात अडकल्याने ही नदी आपले वाहणेच हरवून बसली आहे.
ही नदी बारमाही वाहती करावी, ही संकल्पना भाई संपतराव पवार यांनी जलबिरादरी संस्थेकडे सर्वप्रथम मांडली. त्यास जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, विनोद बोधनकर, डॉ. रवींद्र व्होरा, बापू मदने, नरेंद्र चुघ आणि महेंद्र घागरे यांनी योग्य प्रतिसाद दिला. त्यानंतर राजस्थानातले डॉ. राजेंद्रसिंह यांचे सहकारी गोपालसिंह यांनी सर्वेक्षणानंतर संबंधित नऊ गावातील लोकांचे योग्य सहकार्य लाभल्यास राजस्थानातील जोहाड पॅटर्न खानापुरातही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. अग्रणी ही कृष्णेची उपनदी. खानापूर (जि. सांगली) घाटमाथ्याच्या पठारावर बलवडी गावाच्या बाजूस खानापूर तालुक्यात तामखडीजवळील अडसरवाडीच्या एका टेकडीवर अग्रणीचे उगमस्थान आहे. तिथली उंची 912 मीटर इतकी आहे. ही नदी खानापूर, कवठेमहांकाळ आणि अथणी (जि. बेळगाव, कर्नाटक) या तालुक्यांतून वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. तिथली उंची 549 मीटर इतकी आहे. या नदीचे एकूण अंतर 45 किलोमीटर इतके आहे. या नदीच्या पहिल्या 28 किलोमीटरच्या पात्राला पुनरुज्जीवित करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले. यात खानापूर तालुक्यातील नऊ, तासगाव तालुक्यातील सहा, तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील तेरा गावांचा समावेश होता.
जलबिरादरीने नेमके काय केले?
आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी त्यांच्या राजस्थान राज्यामध्ये पाणी अडवण्याचे, जिरवण्याचे तसेच ओढे, नद्या, नाले जिवंत करण्याचे काम केले आहे. मुळात ज्या भागात पावसाचे प्रमाणच कमी आहे, त्या ठिकाणचे प्रवाह खुले करणे, वाहते करणे हे काम तर जलबरादरी ही संघटना करतेच; तसेच ज्या गावात असा प्रयोग राबवला जातो, तिथल्या रहिवाशांना विश्वासात घेऊन ग्रामसंसद तयार करून त्याद्वारे तिथले सगळे जलव्यवस्थापन करण्याचे कामही जलबिरादरी करते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अवरोध निर्माण करण्यासाठी कंटूरनुसार कालवे काढणे, छोटे सिमेंट बंधारे (चेक डॅम), काटकोन त्रिकोण बांध (ऍलिकट) बांधणे आदी कामेही जोहाड या संकल्पनेत येतात.जलबिरादरीच्या माध्यमातून देशभरात चोवीस हजाराहून अधिक जोहाड उभारले आहेत. या सर्व ठिकाणी नदी किंवा ओढे वाहते करण्याचे काम यशस्वीरित्या झालेले आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर उस्मानाबाद जिल्ह्यात रांजणी येथील भैरवनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठोंबरे यांच्या खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन ते समृध्द पाणलोट व्यवस्थापन म्हणून ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत. तिथे तिथल्या चढ, डोंगर असलेल्या भागात समतल पाझर कालवे काढणे, पावसाचे पडणारे पाणी अडवणे, ते चोहोबाजूंनी बंदिस्त करणे, आवश्यक तेथे छोटे तलाव निर्माण करणे अशी कामे करीत आहेत. डोंगराच्या भागात पाणी अडवले आहे. तसेच खोलगट भाग सहा इंच ते एक फुटापर्यंत मातीने भरून घेऊन आता तिथे भाजीपाला पिकवला जात आहे. काही ठिकाणी खडकात पाणी झिरपत नाही, तिथे पाणी अडवण्यासाठी माती, दगड वापरण्यात येतात. हे झाले काम खासगी कारखान्यांच्या माध्यमातून केलेले. पण महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांपेक्षा ज्या माणदेशातल्या मातीत पाणी अडवून धरण्याची क्षमता जास्त आहे, तिथल्या अग्रणी नदीच्या पाणलोटातही लोकसहभागाची एक सर्वव्यापी मोहीम राबवण्याचा जलबिरादरीने निर्धार केला. जलबिरादरी ही काही निधी देणारी (फंडिंग एजन्सी) संस्था नाही. परंतु लोकांना जलसाक्षर बनवणे, जलजागृती करणे आणि संघटित करून त्यावर उपाय सुचवणे, तसेच विविध क्षेत्रात जलसंवर्धन, जलसंरक्षण क्षेत्रात काम करणारी माणसे जोडणे, हे काम जलबरादरी करते.
खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीकाठच्या सुलतानगादे गावचे ग्रामस्थ सांगतात की, 30-35 वर्षांपूर्वी अग्रणीत दिवाळीनंतर तीन-चार महिने खळाळते पाणी असे, त्यात आम्ही पोहत होतो. आता इथले सरासरी वार्षिक पाऊसमान 550 ते 600 मिलीमीटर लक्षात घेता पोहण्याइतके पाणी जानेवारी अखेरपर्यंत होते, याचा अर्थ त्या काळी नदीत किमान 5 ते 6 फूट पाणी असेल. त्या ठिकाणी पात्र तेवढे खोल असलेच पाहिजे. अलीकडच्या काळात अग्रणीचे पात्र आकसले आहे, तसेच गाळाने गच्च भरले आहे. या नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम जलबिरादरीच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे पुढे न्यायचे, असा निर्णय फेब्रुवारी 2013ला पुण्यात ठरला आणि पुढच्याच महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
अग्रणी पुनरुज्जीवनाचे काम
गेल्या वर्षी मार्चमध्ये अग्रणी पुनरुज्जीवित करण्याच्या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातून सुरुवात झाली. उगमस्थानाजवळच अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. तिथून सर्वेक्षण झाले. या कामासाठी नेमलेल्या पथकाने सुरुवातीच्या टप्प्यात सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन केले. या पथकाने सहा ठिकाणी पाणी अडवण्याच्या दृष्टीने आवश्यक साखळी बंधाऱ्यांची जागा निश्चित केली. इथे अग्रणी नदी दक्षिणेला उगम पावून उत्तरेकडे जाते. तिथून पुढे तामखडी ते बलवडी या रस्त्यानजीकच्या जखिनवाडी हद्दीत ईशान्य दिशेला वळते. तिथे पात्रात मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच मोठया प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे नदी तीन ठिकाणी दुभंगलेली आहे. तसेच पुढे कारीचा म्हसोबा मंदिराजवळही अतिक्रमणामुळे नदी अरुंद झालेली आहे.
अशा ठिकाणचा गाळ, तसेच अतिक्रमणे काढून टाकावी लागणार आहेत. त्यापुढे गोरेवाडी गावाच्या हद्दीत नदी ईशान्येकडून थेट पूर्वेकडे वळली आहे. त्या परिसरात पात्र रुंदावलेले आहे, मात्र तिथेही गाळाने पात्र जमीन पातळीला आले आहे. या गावातून वाहताना नदीला बदकाळ ओढा येऊन मिळतो त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बसू शकतील, असे गोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय सुतार यांनी सुचवले. तिथून पुढे बलवडी, बेणापूर, करंजे अशी वाहत तासगाव आणि पुढे कवठेमहांकाळ तालुक्याकडे जाते. तासगाव तालुक्यात सावळज येथे नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधण्यात आला आहे. राजू सावंत यांच्या ग्रुपने जवळपास 30 मीटरहून अधिक पात्र आडवे आणि खोल खोदून त्यात पॉलिथीन पेपर (अभ्रकाचा कागद) टाकून काळी तसेच करलाची माती आणून टाकली. त्यावर रोलिंग करून हा बंधारा बांधला आहे. त्यामुळे वाहणारे पाणी थांबवून पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही मळणगावपासून रांजणी-लोणारवाडीपर्यंतचे 28 किलोमीटर नदीपात्र रुंद आणि खोल केलेले आहे. तसेच हिंगणगाव बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रातील झाडेझुडूपे काढून पाणी साठवण्यासाठी पात्र उपयुक्त केले आहे. तसेच या नदीतील वाळू उपसा करू नये, केल्यास दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक गावागावात लावले आहेत. या कामी अग्रणी काठच्या हिंगणगावचे उद्योजक देवानंद लोंढे, कवठेमहांकाळचे सरपंच सुनील माळी, चंद्रकात सगरे, तालुका गटविकास अधिकारी अरविंद धरणगुट्टीकर, तसेच परिसरातील गावांतील सरपंच यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य
खानापूर तालुक्यातील बलवडी आणि बेणापूर या दोन गावातील जि.प. सदस्य सुहास शिंदे, भानुदास सूर्यवंशी, राजेंद्र शिंदे, श्रीरंग शिंदे, परशुराम गायकवाड, विलास गायकवाड, सुभाष गायकवाड आदी जाणती मंडळी एकत्र करून भाई पवार यांनीही या भागातील महाविद्यालयांच्या युवाशक्तीचे सहकार्य आपण देऊ, असे आश्वासन दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आराखडे तयार करणे, तसेच श्रमदान करणे या कामी सहकार्य दिले. सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिमेंट बंधाऱ्यांची डिझाईन बनवून दिली. विठ्ठलनगर (बेणापूर) येथे पहिल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले. त्या वेळी डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, तसेच कृषी अधिकारी वगैरे अधिकारिवर्ग उपस्थित होता. त्यामुळे या उपक्रमास शासकीय परिणाम आपोआपच मिळाले. त्यानंतर नदीपात्राचे डिमार्केशन अर्थात हद्दनिश्चिती करण्यात आली. यात रेड झोन म्हणजे पूर रेषा, ब्लू झोन म्हणजे प्रवाहाचे पाणी आणि ग्रीन झोन म्हणजे पात्रालगतचा, असे तीन भाग केले गेले. पहिल्या दोन भागात कोणतेही बांधकाम होणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर जिथे लोकांचा विरोध नाही तिथे बांध बांधायचे, असे नियोजन करण्यात आले. निवृत्त अभियंता विलास चौथाई यांनी काही बंधाऱ्यांचे आराखडे करून दिले. प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यानंतर काही वेळा स्वखुशीने, तर काही वेळा हातउसने पैसे गोळा करून स्थानिक लोकांनी मोठया जिद्दीने कामे पूर्ण केली. या कामी महेंद्र घागरे, ऍड. विनोद गोसावी, गणेश देसाई, नरेंद्र चुघ, राजेंद्र व्होरा यांसारख्या अनेकांनी मदत केली. दिवस-रात्र, ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता राजेंद्र मदने यांच्यासारख्या सरकारी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष फील्डवर उभा राहून लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले. त्यानंतर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने हात दिला आणि अग्रणीवर बांधण्यात आलेले बंधारे अक्षरश: पूर्ण भरून वाहू लागले. इर्षेनेच कसा विकास साधतो, ते खानापूर तालुक्याच्या घाटमाथा परिसरात दिसले. अग्रणी नदीला बारमाही करण्याची संकल्पना पुढे आली आणि बघता बघता त्या संकल्पनेला मूर्त रूपही आले. परतीच्या पावसाने गच्च भरलेले बलवडी आणि परिसरातले बंधारे पाहून बेणापूरकरांनीही या नदीला बांधून ठेवण्याचे महाप्रयत्न सुरू केले.
राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे, सयाजी शिंदे आदीच्या पुढाकाराने तब्बल साडेचार किलोमीटरचे नदीपात्र उभे, आडवे खोल आणि रुंद करण्याची कामे पूर्ण केली. शिवाय त्या ठिकाणी पूर आलाच, तर बंधाऱ्यावर ताण येऊ नये म्हणून एका मोठया भूमिगत बंधाऱ्याचे नियोजन सुरू आहे. शासन जे करू शकलेले नाही किंवा भविष्यातही करणे जमणार नाही, असे काम या भागात लोकसहभागातून उभे राहिले. शिवाय आतापर्यंत शासनाचा एक नवा पैसासुध्दा खर्च झालेला नाही. पदराला खार लावून, स्वत: आर्थिक तोशीस घेत शासनापेक्षा कमी खर्चात, कमी वेळेत आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता केवळ आपली नदी आपणच जिवंत आणि बारमाही करायची, या ध्यासाने हे सगळे काम केवळ विकासाच्या इर्षेने आणि जिद्दीने सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे काम उभे राहत आहे. अशा कामांना पाठबळ देणे हीच खरी काळाची गरज आहे.
8805008957

अग्रणी नदी बारमाही होणार महाराष्ट्रातल्या पहिल्या जल-जन जोडो मोहिमेची फलश्रुती
magazine.evivek.com
No comments:
Post a Comment